मोदी सरकार रोड एक्सीडेंट मध्ये जखमी झालेल्यांवर उपचारासाठी एक मोठी योजना आणत आहे, रोड एक्सीडेंट मध्ये जखमी झालेल्या व्यक्तीं वर अडीच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार केला जाणार आहे.
प्रत्येक वर्षी रस्त्यावर आता जवळपास दीड ते दोन लाख मृत्यू होतो तीन तीस सुमारे तीन लाख लोक अपंग होतात, त्यामुळे अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ताबडतोब उपचार मिळावा व त्यांच्या जीवन वाचावा हा यामागचा सरकारचा हेतू आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यांच्या परिवहन सचिवांना आणि परिवहन आयुक्तांना याबाबत एक पत्र पाठवले आहे त्यानुसार कॅशलेस ट्रीटमेंट योजनेसाठी मोटार वाहन सहायता निधी जमा केला जाईल.
नॅशनल हेल्थ अथॉरिटी ची मदत या मध्ये घेतली जाईल.
रस्ते अपघातातील पीडितांसाठी अपघात आणि आरोग्य सेवांसाठी एका विशिष्ट खात्यात निधी दिला जाईल मात्र गाडीचा विमा नसेल तर भरपाई म्हणून उपचाराचा खर्च वाहन मालकांना करावा लागणार आहे
