गेलवान खोऱ्यात भारतीय लष्कराला चीन विरोधातील कारवाईसाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. गेल्या महिनाभरापासून लडाख सीमेवर भारतीय व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत चीन वारंवार भारताच्या भूमीत घुसखोरी करीत असून भारतीय सैन्य ही त्याला वेळोवेळी रोखत आले आहे
आज नरेंद्र मोदींनी म्हटले की आम्ही देशाची अखंडता व सार्वभौमत्वशी कोणतीही तडजोड करणार नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही आमच्या देशाच्या संरक्षणासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात मागेपुढे बघणार नाही. आम्हाला शांती हवी आहे पण जर भारताकडे कोवाकड्या नजरेने बघत असेल तरी त्याचे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही, चीनने जर भारताला संघर्षासाठी उकसवले तर त्याच चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतात आहे असंही मोदींनी चीनला ठणकवले आहे...
