सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित होऊन मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सानुग्रह अनुदान 30 लाखांचे विमा कवच देण्यात आले आहे महावितरणमध्ये संचालन व दुरुस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयांत कार्यरत असणारे सुरक्षारक्षक यांना देखील 30 लाख रुपयांचे विमासंरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
